Monday, May 13, 2013

कामिनी वृत्त - एक प्रयत्न


आज नील आसमंत हो
चांदण्यात धुंद चंद्र हो

सूर लावला मनी तुझा
छंदमुक्त भावगीत हो

तेच स्वप्न काय शोधतो
या युगास उचित ध्येय हो

आज आसवांपल्याड जा
आणि कोवळा वसंत हो

एवढेच सांगतोय 'अभि'
वाचनीय चार शब्द हो ..

-- अभिजित गलगलीकर -- १३-०५-२०१३

Friday, January 4, 2013

ध्यास


विचारांचा आवेग
इच्छापूर्तीचे भास
रम्य मृगजळालाही
सत्याचीच आरास

आतुरल्या स्वप्नांचा
चाकोरीबद्ध ध्यास..
जणू मनात रोखलेला
मनमोकळा श्वास..

हळव्या कातरवेळी
आठवणींची मिजास
कोवळ्याशा सकाळी
मंद शबनमी सुवास

ठेवून जमिनीशी इमान
क्षितिजाची  धरली कास
सांग मज गवसेल का
स्वछ निळेशार आकाश

-- अभिजित गलगलीकर
४-१-२०१३

Tuesday, May 1, 2012

रुबाई


तिनका तिनका यादें मिली, कतरा कतरा स्याही मिली.
खो गई थी जो हक़ीकत मे, सपनों मे वो रुबाई मिली.

उसका नीला कारवाँ इस अंबर से भी गहरा था
मेरी आखों मे उसका मौसम आज भी सुनहरा था

उसकी और मेरी बुनियाद कुछ अल्फाजों से जुड़ी रही
वो कागज़ पलट चले गये, मेरी कलम वही खड़ी रही

इन नूरानी सपनों से जागे कुछ ही लम्हे बीते है,
वही कुछ पल थे, जो जिंदगी ने हारे है, मैने जीते है...

-- अभिजीत ०१-०५-२०१२

बयाँ


क्या ना लिखा.. फिर भी लगता है कुछ न लिखा..
कितनी सारी साँसे दबा के रखी है सीने मे,
हँसती खेलती.. गुमसुम सी ,गुमनाम सी..
दबे दबे ठहाको मे पहाड़ो की गूँज सी..
इन्ही ख़यालात को पालपोस के कुछ अल्फ़ाज़ सीँचे है मैने..
उसी रेशमी स्याही से नम हुए है दिल के कागज..
नब्ज़ थम जाएगी तभी ये नमी सुर्ख होगी..
शायद तब भी ये लगे, कुछ साँसे और चाहिए मेरे बयाँ के लिए.

अभिजीत - २९-०२-२०१२

Wednesday, January 25, 2012

जाऊं कहां बता ए दिल - रसग्रहण

तुम्हाला कधी असं जाणवलंय का, मनाला कोळिष्टकं लागली आहेत. त्या गुंत्यात जीव अडकून पडतो आणि हा पसारा आवरताना जळमटं प्रत्येक विचारांना चिकटतात.

अस्संच जाणवलं हे गाणं ऐकताना,
जाऊं कहां बता ए दिल, दुनिया बड़ी है संगदिल
चांदनी आई घर जलाने, सुझे ना कोई मंजिल...

शैलेंद्र यांचे शब्द, शंकर-जयकिशन यांचं संगीत.. चित्रपट छोटी बहन.


अतिशय उत्कट शब्दात हा गुंता कवीनी मांडलाय. कुठेही जाऊन उत्तर शोधलं तरी कधी कधी प्रश्नांचेच पुतळे उभे राहतात. त्यांचे जाळे गुरफटून टाकतात. कुणाचा आधार मिळेल असं वाटतं तर उलट त्या तेजानी डोळे दिपतात आणि काळोख आणखी गडद होतो..

बनके टूटे यहां आरजू के महल
ये जमीं आसमाँ भी गये हैं बदल
कहती हैं जिंदगी, इस जहाँ से निकल.... जाऊं कहां ..

कोणत्याही नात्याला काय लागतं तर , प्रेमाचा पाया आणि प्रेमाचीच उब.. भावनांची पाखरण आणि विश्वासाचं संरक्षण. हे आधारस्तंभ आणि मायेचं आभाळ रुसलं तर सगळंच कोसळतं. अगतिक मन त्या आभाळाकडे पाहत राहतं.. कुणी तरी येईल, मला सोबत नेईल. कुणिच नाही आलं तर देव तरी.
आसवांनी कितीही डोळे ताणून पाहिलं तरी ते क्षितिज शेवटी दूरच.