Tuesday, March 18, 2008

प्रेम म्हणजे नेमकं काय बरं असतं......

प्रेम म्हणजे नेमकं काय बरं असतं
थोडंसं हळवं ,थोडंसं बावरं असतं

प्रेम म्हणजे चंचल काजळ नव्हे
पापण्यांत दडवलेला सोनुला थेंब असतं
दोन तरल मनांतनं साकारलेलं
एकमेकांच्या डोळ्यातलं प्रतिबिंब असतं

प्रेम म्हणजे आठवणींचे गर्द रान
नकळत सुटावं असं अवचित भान
अंतर्मनाची जणु सुरेल ती तान
अवखळ चांदणं मनातलं ते गोरंपान

प्रेम म्हणजे फ़क्त कविकल्पना नसतं
चारोळीत मावेल अशी वल्गना नसतं
मी तरी अजुन काय काय सांगू
कल्पनातीत, शब्दातीत, विलक्षणा असतं

-- अभिजित गलगलीकर (१८-३-२००८)

Friday, March 7, 2008

प्रेम...

प्रेम नितळ करायचे
प्रेम निश्चल करायचे
सर्वव्यापी प्रेम करायचे
अखंडित त्या प्रेमाला व्यापायचे

प्रेम शाश्वत करायचे
प्रेम सारस्वत करायचे
अपार सुंदर प्रेम करायचे
भव्य मंदिर प्रेमाचे स्थापायचे

प्रेमावर प्रेम करायचे
ह्या मनावर प्रेम करायचे
त्याच्या उगमावर प्रेम करायचे
मिलनरुपी अस्तावर प्रेम करायचे

प्रेम तिच्यावर करायचे
तिच्या कणांकणांवर करायचे
आयुष्याच्या कणाकणांनी करायचे

Thursday, March 6, 2008

काय आज झाले ...

काय आज झाले , मन मनात नाही
काय हे उमगले , मी या तनात नाही

भाग्य हे असे , माझे ते न कधी
जीवन हे असे , त्याचा मी न कधी
सगळ्यांचा मी आहे , माझं कुणी नाही
आनंद एवढाच ,कुणाच्या मी दुःखात नाही
काय आज झाले ...

जगत राहण्याची सवय फ़ार जुनी
हसत राहण्याची सवय फ़ार जुनी
अश्रू आमचे एवढे अनमोल नाही हो
म्हणुनच कधी हा श्वास हुंदक्यात नाही
काय आज झाले ...

उगा का मी हे लिहत बसावे
उगा आठवणी आळवत बसावे
ख्ररं तर मस्त गोड गोड लिहत रहावे
या कवितेला कसला काही रीत-भात नाही
काय आज झाले , मन मनात नाही ....


मलाच माहीत नाही मी ही कविता का लिहिलीय .. ... बघा कशी वाटते ...

Thursday, February 21, 2008

आवारगी...

आवारगी, शहर में इस कदर जमी रहें
विरानियाँ छुपके इस दिल में थमी रहें

यूँ ही महफ़िलों का दौर चले,दिन-ब-दिन
कोई फ़िसली आह, इस शोर मे अनसुनी रहें

दाँव-ए-मरासिम पे लगाते फ़िरे इस दिल को
जिंदगी अपने इस अलबेले शौक पे बनी रहें

खुशियों का ,ये दिल तो ,मायका हो जैसे
अपनी अपनी फ़ुरसत से वो आती जाती रहें

इतना गुस्सा न कर जमाने पे , अभिजित
किसी ना किसी से तो, जमाने की बेरुखी रहे

--- अभिजित -- (२०-२-२००८)

Saturday, February 16, 2008

अवसेच्या रात्रीचं गुपित ..

चैतलीच्या अमावस्येच्या रात्रीवरील कवितेला लिहिलेलं हे उत्तर .. ..

घुसमटते रात्र दर अवसेला
आपल्या प्रियकराच्या शोधात
कावरीबावरी फ़िरते
ताऱ्यांची दारं ठोठावते
कुठेच नाही हे पाहून
रडू फ़ुटते तिला
जणु तिच्या आसवांनी
आकाश चक्क धुतल्या जाते
लख्ख दिसते, चांदणं लेवते
रात्र अजुनच हिरमुसते
ताऱ्यांना खुडुन बघते
बघते कुठे दिसतो का
चंद्रही देव जाणे कुठे गेलाय
की पंधरा दिवस काम करुन
थकुन, चंदेरी दुलईत झोपलाय
तसंच असावं बहुतेक
निशाबाईंनाही ते कळतं बहुतेक
शोधते मग ती पडद्याआड
अन अन ..
शेवटी त्या दुलईत तो सापडतो
चंद्रही लगेच तिला कुशीत ओढतो
खुदकन हसुन तिही बिलगते
अन चमकन दुलईआड दडते
बहुतेक ह्यालाच आपण
तारा तुटणं म्हणत असु.. नाही का ? .