नकळत आसवं साकळत जातात
निखाऱ्यांसम स्वगत जळत जातात
ओलावतो मनाचा कोपरा कोवळा
आकारतो विचारडोह गर्द सावळा
पापण्यातच मग स्वप्नं वाळत जातात
नकळत....
जाणले आभाळाचे मन जेव्हा
आठवणींचे थेंब झाले तेव्हा
मग नभातून नवक्षण उमलत जातात
रुसल्या आसवांना हसवत जातात
आतुर मन-चातकाला शमवत जातात.........