Sunday, April 1, 2007

मनाचे उपद्व्याप..

हातात तुझा हात असावा, नयनी सदा तुच असावी
मनाला तुझ्यावाचून चैन पडेना, त्याल सवे सदा तुच हवी

मन धावतं क्षितिजाकडे, नजर त्याची रोखलेली
हाती काही लागेना,त्याला मात्र हीच वेडी आशा हवी

मन कधी ढग बनुन फ़िरतं, तुला शोधत सगळीकडे
चंचल हवेला चुकवत, कारण फ़क्त तुच भिजायला हवी

मन कधी थांबतं, निपचित पडुन राहतं
फ़िरुन थकलेलं, त्याला तुझी एक झुळूक हवी

दिवसभर आठवणींच्या झळा, मग येते गार कातरवेळ
असेनात असंख्य,पण चांदण्यांपैकी त्याला फ़क्त तुच हवी

मन घेतं रुप मग शिंपल्याचं, घेतं सागरात उडी
एकच आशा,किनाऱ्याच्या रुपात तिथे तु असावी

निघतं उत्साहात प्रवासाला, आठवणींची शिदोरी घेउन
कुठे ते ना ठावे, त्याला फ़क्त तुझी सोबत हवी

मन रमतं शब्दांच्या सहवासात, भान हरवतं
तिथेही त्याला अक्षररुपात तुच रेखाटलेली हवी..

No comments: