Friday, August 3, 2007

मुन्नाभाई...

नमस्कार मित्रानो... संजू बाबाला झालेल्या शिक्षेवरुन ही कविता मला सुचली ...मला जे वाटते ते मी लिहिलं , चू-भू माफ़ असावी.. ..

मुन्नाभाईंचे दिवस फ़िरले
झाले सगळे राज्य खालसा
खरी गांधिगिरी शिकायला
तुरुंगात निघाला जलसा

जनता खूप हळहळली
त्यांची निर्मळ इच्छा तुटली
त्यांची तरी काय चूक हो
चित्रपटातली भुमिका पटली

शस्रं देणाऱ्याला जन्मठेप
अन घेणाऱ्याला काहीच नाही
तेव्हा जो माणुसकी विसरला
माफ़ी मागताना त्याला लाजच नाही

त्याने दीड वर्ष भोगले
निष्पाप पूर्ण जन्म भोगत आहेत
रडेल मुन्ना आणि चार दिवस
ते कधीचे अश्रूच बघत आहेत

म्हणून मुन्नाने ही अग्निपरिक्षा द्यावी
निर्मळ सोने होण्यासाठी शिक्षा घ्यावी
सुप्रीम कोर्ट वाचवेलही सुद्धा
पण त्याने न्यायाचीच दिक्षा घ्यावी
मग नंतरचा मुन्ना खरा निरागस असेल
स्वतःच्या नजरेत निर्दोष असेल...

2 comments: